Friday 8 April 2011

वीरांचा कैसा असे वसंत


कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या 'वीरों का हो कैसा वसन्त' या कवितेचा मी भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे .

येतसे हिमालयातून आव्हान |
 उफाळून येई सागरा उधाण |
क्षितिज असो की नभ अनंत|
पुसति सारे दिग दिगंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

सजली वने लेऊन अनेक रंग |
फुलातुनी दरवळे नव सुगंध|
वसुधेचे पुलकित हर एक अंग|
पण देशमन दिसे सचिंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

भरे कोकीळ तो मधुर तान |
भ्रमर गुंजरावात करिती गान|
निवडा विलास की रण अनंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

हाती मधुघट की क्रुपाण|
यौवनांगा की धनुष्य बाण |
हीच समस्या होत दुरंत  |
वीरांचा कैसा असे वसंत|

आता इतिहासा मौन त्याग|
लंके का तुजला लागे आग|
हे कुरुक्षेत्रा आता जाग जाग|
सांग तुझे अनुभव अनंत|


हळदीघाटाच्या शिळांनो या |
सह्याद्रीच्या दुर्गानो या |
शिव-प्रताप गाथानो या|
जागवा आज त्या स्मृति ज्वलंत|
वीरांचा कैसा असे वसंत|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
१०/०१/२०११ 
१०/१/२०११

No comments:

Post a Comment