Monday 12 September 2011

मैत्री

जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।

जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।

शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।

मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती।

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१ / ०९  /२०११

No comments:

Post a Comment