Monday, 12 September 2011

मैत्री

जगण्याच्या वाटेवरती मरणाची भेट घडते।
मरणाच्या दारी तेव्हा जगण्याची किँमत कळते।

जन्माला येणार्याची शेवटी होतेच माती।
पैशाचे ढीग रत्नांच्या राशी न अंती कामी येती।

शेवटच्या प्रवासाकरिता लागती चार खांदे।
त्यासाठी जोडावे जगताना जिवलग मित्र खंदे।

मैत्रीचा हा महिमा आणखी वर्णावा किती।
मित्रांची साथ मिळता न उरे कळिकाळाची भिती।

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१ / ०९  /२०११

Saturday, 18 June 2011

पक्षी पिंजर्यातून उडाला

शहाने हुशारीने रचला होता डाव,  दख्खनी राजाला दावायचा शाही बडेजाव।
तख्तापुढे लवति जिथे खान राणे अन् राव, तिथे कुठे लागावा स्वराज्याचा पडाव।

ज्या नरसिँहाने अफजलखान फाडला ,शास्ताखान बोट छाटुन माघारी धाडला।
 ज्याच्या फौजेने सुरतेत केला कहर, तो शिवा हात जोडत दरबारी होणार हजर।

दरबारी दाखल झाली शिवरायांची स्वारी।शहाने राजांना ठरविले जहागीरदार पंचहजारी।
 ज्यांनी रणात मावळ्यांना दाविली पाठ। शिवरायांपुढे मिरवीती माना करुनी ताठ।

पण आलमगीरास पडला एका गोष्टीचा  विसर । सिंह  कैद झाला तरी कैद होत नाही त्याची जिगर।
आणि त्या दिवशी दरबारात एक नवल घडल । मराठी वाघाच्या डरकाळीने दिल्लीच तख्त हादरल|

नकोत त्या अपमानाच्या खिलती अन् नाहि  पांघरणार लाचारीच्या झुली ।
अपमान पचवत न घालणार मान खाली। ऐकता खडे बोल ती सभा थरारली।

महाराजांभोवती पडला शाही  फौजेचा गराडा, फुलादखानान ठेवला पहारा खडा।
तोडायचा कसा आता हा वेढा।महाराजांच्या जीवलगांपुढे उभा राहिला सवाल बडा|

औरंगशाहाचे डोके जेव्हा  लागले घातपाताचे  डाव लागले रचायला |
राजपुती वचनासाठी  कुंवर रामसिंग उभा राहिला राजांचे प्राण रक्षयाला|

शेवटी सह्याद्रीच्या रानच्या   वाघाला आग्र्याच्या महालांची  हवा नाही मानवली |
महाराष्ट्रसुर्याला नजर कुणाची लागली,दिवसेंदिवस  महाराजांची तब्येत बिघडू  लागली|

वैद्य  आणि हकीमांकडे औषधासाठी मावळ्यांच्या चकरा झाल्या सुरु |
दुवा मिळण्या गरिबांच्या वाटले जाऊ लागले पेठा, पेढे बर्फी अन  लाडू|

एक दिवस वेढ्यातून न तपासताच बाहेर पडला एक मिठाईचा पेटारा |
तपासणार कोण  कशाला ,पहारेकर्यांसाठी झालता नित्याचा मामला सारा|

जेव्हा औषध आणायला  गेलेला कुणीही माघारी नाही आला |
तेव्हा फुलादखानाच्या मनी संशयाचा किडा  जागा झाला |

शोधून पाहिलं आत तर मराठी शेर गायब झालेला |
हजारोंच्या  फौजेचा पिंजरा तोडून पक्षी उडालेला |
धूळ चारत आले होते  आजवर वीर दुष्मनाला |
आज मराठी राजाने होता मिठाईतून डाव साधलेला |



©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१८  / ०६  /२०११ 





Sunday, 22 May 2011

प्रभू चरणी वंदन

सुभद्राकुमारी चौहानांच्या 'ठुकरा दो या प्यार करो' या कवितेचा मी भावानुवाद केला आहे.

देवा तुझे भक्त तुझ्या दारी अनेक प्रकारे येती |
तव सेवेस्तव अनेकरंगी वस्तू आणती |

सजूनिया वाजत गाजत तुझ्या मंदिरी ते येती |
सुवर्णरत्नासम  मूल्यवान वस्तू तुला अर्पिती |

मी एक गरीब काही हि न घेवून आलो |
तरीही साहस करुनी पुजेस उभा राहिलो | 

धूप दीप नैवेद्य नसे अन बहुरंगी आरास नसे |
चरणी  तुझ्या वाहण्यास  फुलांचा हारही नसे |

गुणगानास्तव तुझिया स्वरात माधुर्य नसे |
सांगण्यास भाव मनीचे वाणीचे चातुर्य नसे|

नसे दान अन  नसे दक्षिणा रिकाम्या हातीच आलो|
न ठाऊक पूजाविधी तरीही तुझ्या दर्शनास आलो |

पूजाविधी न ठाऊक मजला ठेवतो मन तुझ्या चरणी |
दान दक्षिणा नसे परंतु भक्ती तुझी असे सतत मनी |

तव प्रेमाचे  तहानलेले हृदय घेवूनीया आलो |
एवढेच आहे मजपाशी तेच अर्पिण्यास आलो |

चरणी तुझ्या अर्पितो मन यापरते काय सांगू |
हे तर तुझीच देणगी  कर याचा स्वीकार प्रभू |


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२२ / ०५ /२०११ 
मूळ कविता पुढीलप्रमाणे 
ठुकरा दो या प्यार करो
देव! तुम्हारे कई उपासक कई ढंग से आते हैं
सेवा में बहुमूल्य भेंट वे कई रंग की लाते हैं

धूमधाम से साज-बाज से वे मंदिर में आते हैं
मुक्तामणि बहुमुल्य वस्तुऐं लाकर तुम्हें चढ़ाते हैं

मैं ही हूँ गरीबिनी ऐसी जो कुछ साथ नहीं लायी
फिर भी साहस कर मंदिर में पूजा करने चली आयी

धूप-दीप-नैवेद्य नहीं है झांकी का श्रृंगार नहीं
हाय! गले में पहनाने को फूलों का भी हार नहीं

कैसे करूँ कीर्तन, मेरे स्वर में है माधुर्य नहीं
मन का भाव प्रकट करने को वाणी में चातुर्य नहीं

नहीं दान है, नहीं दक्षिणा खाली हाथ चली आयी
पूजा की विधि नहीं जानती, फिर भी नाथ चली आयी

पूजा और पुजापा प्रभुवर इसी पुजारिन को समझो
दान-दक्षिणा और निछावर इसी भिखारिन को समझो

मैं उनमत्त प्रेम की प्यासी हृदय दिखाने आयी हूँ
जो कुछ है, वह यही पास है, इसे चढ़ाने आयी हूँ

चरणों पर अर्पित है, इसको चाहो तो स्वीकार करो
यह तो वस्तु तुम्हारी ही है ठुकरा दो या प्यार करो

Thursday, 12 May 2011

मैत्र जीवांचे

सुहृदांच्या संगतीने आयुष्याची पाऊलवाट चालावी |
आपुलकीच्या स्पर्शाने अश्रुंचीही फुले व्हावी |

संकटात मित्रांची साथ आनंदात मायेची उब मिळावी |
लहानांकडून आदर वडीलधार्यांकडून कौतुकाची थाप मिळावी |

आनंदाची बरसात अशींच सदैव अखंड चालावी |
आपल्या माणसांच्या सोबतीत जगण्याची मैफल रंगावी |

सुखदुःखाचा हरेक क्षण मित्रांच्या सोबतीत साजरा व्हावा |
हाकेआधीच ओ देणाऱ्या मैत्रीचा  हेवा का न वाटावा |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
०४/०२/२०११ 


Friday, 8 April 2011

वीरांचा कैसा असे वसंत


कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांच्या 'वीरों का हो कैसा वसन्त' या कवितेचा मी भावानुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे .

येतसे हिमालयातून आव्हान |
 उफाळून येई सागरा उधाण |
क्षितिज असो की नभ अनंत|
पुसति सारे दिग दिगंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

सजली वने लेऊन अनेक रंग |
फुलातुनी दरवळे नव सुगंध|
वसुधेचे पुलकित हर एक अंग|
पण देशमन दिसे सचिंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

भरे कोकीळ तो मधुर तान |
भ्रमर गुंजरावात करिती गान|
निवडा विलास की रण अनंत|
वीरांचा कैसा असे वसंत|

हाती मधुघट की क्रुपाण|
यौवनांगा की धनुष्य बाण |
हीच समस्या होत दुरंत  |
वीरांचा कैसा असे वसंत|

आता इतिहासा मौन त्याग|
लंके का तुजला लागे आग|
हे कुरुक्षेत्रा आता जाग जाग|
सांग तुझे अनुभव अनंत|


हळदीघाटाच्या शिळांनो या |
सह्याद्रीच्या दुर्गानो या |
शिव-प्रताप गाथानो या|
जागवा आज त्या स्मृति ज्वलंत|
वीरांचा कैसा असे वसंत|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
१०/०१/२०११ 
१०/१/२०११

Saturday, 2 April 2011

काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला

द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली।


भारतवर्षीचे राजे होते त्या सभेत जमलेले।बनविण्या तिज अर्धाँगी काही जण आसुसलेले।
परी बिकट तो मत्स्यवेध ना कुणास जमला | लाविता प्रत्यंचा धनुला दम कित्येकांचा फुलला।


वांझ ठरे का वीर प्रसवा भारतभूमी | की या धरेवर दुष्काळ वीरांचा पडला |
पाहुन दृश्य समोरी द्रुपद ही चिंतीत बनला। जिंकील जो पणात असा का नरसिंह भारती नुरला।


तितक्यात उठे पदरव सामोरा ये नरपुंगव। दानवीर म्हणती ज्याला तो कवचधारी सुर्यकुलोद्भव
सुवर्णासम ज्याची कांती वज्रासम ज्याचे बाहु।कुंडले शोभती  ज्याला तो सव्यसाची अजानुबाहु।


उचलुनी धनुष्य हाती अंगराज शरसंधाना सिध्द होई।तितक्यात कटु स्वर एक कानी कर्णाच्या येई।
भर सभेत गर्जे द्रुपदकन्या वरणार न मी सुतपुत्राला। मृत्तिकेत न शोभे मोती हंसिनी न मिळे कावळ्याला।


सूतपुत्र कि राजकुमार जन्म तर दैवाने मिळतो |कुणा नशिबी फुलांच्या पायघड्या अन कुणा वनवास  मिळतो |

परिस्थितीच्या ऐरणीवर अडचणींचे जो घाव झेलतो  |संकटाच्या मुशीतूनच तर तो खरा  नरवीर जन्मा येतो | 

पुरुषार्थ म्हणती कशाला ना ठावे खुळ्या द्रौपदीला।सुतपुत्र म्हणत जिने अव्हेरले सुर्यपुत्राला |
दुराभिमानापोटी जिने लाथाडिले सौभाग्याला। काय म्हणावे सांगा पांचालीच्या र्दुभाग्याला।


©परिमल विश्वास गजेंद्रगडकर 
०२/०४/२०११ |

Tuesday, 29 March 2011

वीरों को नमन

कठनाइयों की चले आँधी अड़चनें बन जाए तूफान|
फिर भी ना ढले जो पथ से कहलाते वो ही वीर महान|
चाहे आकाश से बरसे आग या तीरों की हो बौछार|
मातृभूमि के लिए झेलते सिने पे शत शत प्रहार|
पत्ता बने भाला हर डाली बन जाए तलवार|
जब देश पर मर मिटने को हर इंसान हो तय्यार|
स्वतंत्रता के लिए जिन्होने कष्ट सहे अपरंपार|
उन वीरों को सर झुकाके नमन करूँ मैं सैंकड़ो बार|
 ©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१६/१२/२०१०
'जिथे गवताला भाले फुटतात'  या नाटकाच्या शीर्षकावरून मला या ओळी सुचल्या.या ओळी मी गेल्या वर्षी बांग्लादेश विजयदिवसाच्या दिवशी लिहिल्या होत्या. परवा २३ मार्चला मी या ओळी माझ्या कंपनीतील ब्लॉग वर टाकल्या होत्या. आज इथे लिहितोय.

Saturday, 26 March 2011

दोस्तों का साथ

दुश्मनों ने शुरू किया है रह पर कांटे बिछाना |
खुदा भी शायद  चाहता है बन्दे को अपने आजमाना|

राह पर आते संकटोसे डरनेवाले हम नहीं |
जिंदगीसे मुंह मोड़ कर जानेवाले हम नहीं |

दोस्तों के साथ रहते होती है हर मुश्किल आसान|
साथ चलने पर पायेगा कारवां अपना मुकाम |

ऐसे ही निभाते रहना दोस्ती का फर्ज यारों |
दोस्तों के साथ में सह जायेंगे मुश्किलें हजारों
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२०/०२/२०११

Friday, 25 March 2011

फरक कुठे पडला आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी  ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ  तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१२/३/२०११

Sunday, 20 March 2011

लढण्याची जिद्द बाकी आहे

हजार घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे 
जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे
पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे 
कंठनाल छेदुनही झुंजणारा देह बाकी आहे
घात करूनही आप्तांनी साथीस सह्याद्री बाकी आहे
कैद होवूनही शंभू अंतरी स्वराज्य बाकी आहे
एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे
जरी पराभव झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द बाकी आहे
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२१/०१/२०११
"बचेंगे तो और भी लडेंगे" या मराठी बाण्याच्यावरून स्फुरलेल्या ओळी