Tuesday, 29 March 2011

वीरों को नमन

कठनाइयों की चले आँधी अड़चनें बन जाए तूफान|
फिर भी ना ढले जो पथ से कहलाते वो ही वीर महान|
चाहे आकाश से बरसे आग या तीरों की हो बौछार|
मातृभूमि के लिए झेलते सिने पे शत शत प्रहार|
पत्ता बने भाला हर डाली बन जाए तलवार|
जब देश पर मर मिटने को हर इंसान हो तय्यार|
स्वतंत्रता के लिए जिन्होने कष्ट सहे अपरंपार|
उन वीरों को सर झुकाके नमन करूँ मैं सैंकड़ो बार|
 ©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१६/१२/२०१०
'जिथे गवताला भाले फुटतात'  या नाटकाच्या शीर्षकावरून मला या ओळी सुचल्या.या ओळी मी गेल्या वर्षी बांग्लादेश विजयदिवसाच्या दिवशी लिहिल्या होत्या. परवा २३ मार्चला मी या ओळी माझ्या कंपनीतील ब्लॉग वर टाकल्या होत्या. आज इथे लिहितोय.

Saturday, 26 March 2011

दोस्तों का साथ

दुश्मनों ने शुरू किया है रह पर कांटे बिछाना |
खुदा भी शायद  चाहता है बन्दे को अपने आजमाना|

राह पर आते संकटोसे डरनेवाले हम नहीं |
जिंदगीसे मुंह मोड़ कर जानेवाले हम नहीं |

दोस्तों के साथ रहते होती है हर मुश्किल आसान|
साथ चलने पर पायेगा कारवां अपना मुकाम |

ऐसे ही निभाते रहना दोस्ती का फर्ज यारों |
दोस्तों के साथ में सह जायेंगे मुश्किलें हजारों
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२०/०२/२०११

Friday, 25 March 2011

फरक कुठे पडला आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी  ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ  तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर
१२/३/२०११

Sunday, 20 March 2011

लढण्याची जिद्द बाकी आहे

हजार घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे 
जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे
पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे 
कंठनाल छेदुनही झुंजणारा देह बाकी आहे
घात करूनही आप्तांनी साथीस सह्याद्री बाकी आहे
कैद होवूनही शंभू अंतरी स्वराज्य बाकी आहे
एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे
जरी पराभव झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द बाकी आहे
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२१/०१/२०११
"बचेंगे तो और भी लडेंगे" या मराठी बाण्याच्यावरून स्फुरलेल्या ओळी